Knowledge Inshort

Decades of wait are over : वंदे भारत ट्रेनने श्रीनगरमध्ये इतिहास रचला

Decades of wait are over: काश्मीर खोऱ्याला भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची तीन दशकांची प्रतीक्षा अखेर संपली. शनिवारी, वंदे भारत ट्रेनने आपल्या पहिल्या यशस्वी चाचणीदरम्यान श्रीनगरमधील नौगाम रेल्वे स्थानक गाठले, ज्यामुळे भारताच्या रेल्वे इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला.

Decades of wait are over

Decades of wait are overकाश्मीर खोऱ्याला भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat train) तीन दशकांची प्रतीक्षा अखेर संपली. शनिवारी, वंदे भारत ट्रेनने आपल्या पहिल्या यशस्वी चाचणीदरम्यान श्रीनगरमधील नौगाम रेल्वे स्थानक गाठले, ज्यामुळे भारताच्या रेल्वे इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. ही ट्रेन सकाळी ८ वाजता कटरा स्थानकावरून निघाली आणि फक्त साडेतीन तासांत नौगाम स्थानकावर पोहोचली. यानंतर चाचणी पूर्ण करण्यासाठी गाडीने बडगाम स्थानकाकडे प्रस्थान केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर आता आम्ही उद्घाटनासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक गाडीचे उद्घाटन करतील अशी अपेक्षा आहे.”

 

अभियांत्रिकी चमत्कारांचा प्रवास (Vande Bharat train)

ट्रायल दरम्यान, वंदे भारत ट्रेनने कटरा आणि काझीगुंडदरम्यानच्या कठीण भूभागांवरून प्रवास केला. या मार्गात अनेक अभियांत्रिकी चमत्कारांचा समावेश आहे.

चिनाब पूल :

हा पूल ३५९ मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून ओळखला जातो.

अंजी खाड पूल:
४७० मीटर लांबीचा हा केबल-स्टेड पूल ३३१ मीटर उंच आहे, जो आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे.

 

जम्मू-श्रीनगर वंदे भारत ट्रेनचे खास वैशिष्ट्ये (Vande Bharat train)

दिल्ली-जम्मू-श्रीनगर मार्गासाठी डिझाइन केलेल्या या वंदे भारत गाड्या कठीण हवामान परिस्थितीतही प्रभावी कामगिरी करण्यास सक्षम आहेत. हिवाळ्यात शून्याखालील तापमानात देखील या गाड्या प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास सुनिश्चित करतात. यामध्ये प्रगत हीटिंग सिस्टम तसेच बर्फाळ हवामानासाठी विशेषतः तयार केलेले फीचर्स आहेत.

काश्मीर रेल्वे मार्गाचा इतिहास आणि वाटचाल (Vande Bharat train)

काश्मीरला अखंडपणे देशाशी जोडणाऱ्या २७२ किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर रेल्वे मार्गाची संकल्पना १९९४ मध्ये मांडली गेली होती. २००२ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी याला राष्ट्रीय प्रकल्प घोषित केले.

प्रगतीचे टप्पे

२००८: अनंतनाग-मझमा (बडगाम) मार्गाचे उद्घाटन झाले.
२००९: मजहामा-बारामुल्ला आणि अनंतनाग-काझीगुंड मार्ग सुरू झाले.
२०१३: काझीगुंड-बनिहाल मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

वंदे भारत ट्रेन: देशाला जोडणारा नवा धागा

ही गाडी काश्मीरसाठी केवळ प्रवासाची सुविधा नसून, आर्थिक विकास, पर्यटन, आणि काश्मीरच्या प्रगतीचा मार्गही आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top